Beneficiary Log-in:    
वार्षिक परिक्षेसाठी शुभेच्छा!: दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! वार्षिक परीक्षेसाठी शुभेच्छा!: सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेसाठी शुभेच्छा! 

मातोश्री प्रेमाबाई जैन उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना

उद्दिष्ट

जळगाव जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, परंतु उत्तम शैक्षणिक क्षमता असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे.

निवडीचे निकष

  • नवीन अर्जदारांसाठी :
    • - विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असावा.
    • - इयत्ता १०वी व त्यापुढील परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
    • - एकूण कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.२ लाखांपेक्षा कमी असावे.
    • गुणांची पात्रता
    • - इयत्ता १०वी: ग्रामीण भागातील विद्यार्थी - ८५ टक्के गुण, शहरी भागातील विद्यार्थी - ९० टक्के गुण.
    • - इयत्ता १२वी: ग्रामीण भागातील विद्यार्थी - ७० टक्के गुण, शहरी भागातील विद्यार्थी - ७५ टक्के गुण.
    • - एमएच-सीईटी किंवा समकक्ष परीक्षेत किमान १२० गुण मिळणे आवश्यक.
    • - दिव्यांग / एकल पालक/ निराधार विद्यार्थी इयत्ता १० वी. ७५ टक्के गुण, इयत्ता १२ वी. ६५ टक्के गुण.
  • नूतनीकरण अर्जदारांसाठी :
    • - विद्यार्थी (ड्रॉप-आउट विद्यार्थ्यांसह) एसडी-सीड शिष्यवृत्ती लाभार्थी असावा.
    • - विद्यार्थी मागील शैक्षणिक वर्षातील परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • - विद्यार्थ्यास फक्त एका विषयात ATKT मिळालेला असावा.
    • - एकूण कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.२ लाखांपेक्षा कमी असावे.
    • - दिव्यांग / एकल पालक / निराधार विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल.
    • गुणांची पात्रता
    • अ. इयत्ता १२ वी ते पदवी (प्रथम वर्ष) : किमान ७५ टक्के
    • ब. डिप्लोमा (तृतीय वर्ष) ते पदवी : किमान ७५ टक्के
    • क. पदवी ते पदव्युत्तर : किमान ७५ टक्के

प्रक्रिया

  • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यापासून सप्टेंबर अखेरीपर्यंत सुरु असते.
  • विद्यार्थी आमच्या http://sdseed.in/Scholarship/ स्कॉलरशिप / वेबसाइटवरून शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात
  • पहिल्यांदा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःची वेबसाइटवर नोंदणी करुन त्यांचे ऑनलाइन अर्ज सादर करावे.
  • नूतनीकरणासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांनी त्यांची शैक्षणिक माहिती त्यांच्या ऑनलाइन खात्यात अद्ययावत करावी आणि अर्ज सादर करावा.
  • नवीन आणि नूतनीकरण अर्जदारांचे ऑनलाइन अर्ज पूर्ण झाल्यावर अखेरीस पोचपावती जनरेट होते. त्यासोबत आव्यश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून एसडी-सीडच्या कार्यालयात जमा करणे.
  • निवड समिती प्रत्येक अर्जाची सखोल छाननी करून अर्जदाराच्या पात्रता निश्चित करते.
  • समितीचे सदस्य पडताळणीसाठी विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी भेट देतात आणि शिष्यवृत्ती योग्य विद्यार्थ्यालाच मिळेल याची सुनिश्चीती करतात.
  • निवडलेल्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या वार्षिक शिष्यवृत्ती वितरण समारंभात शिष्यवृत्ती दिली जाते आणि उर्वरित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली जाते.
  • एसडी-सीडमार्फत राबवित असलेल्या लाभार्थी हिताच्या उपक्रमांचा लाभ मिळण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना 'लाभार्थी ओळख पत्र' देण्यात येते. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या बेनेफिशिअरी लॉग-इनद्वारा ते याचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपण वेबसाईटला भेट देऊ शकता.
  • लाभार्थ्यांच्या मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, सध्याचा पत्ता यामध्ये काही बदल झाल्यास त्यांनी बेनेफिशिअरी लॉग-इनद्वारे त्यांचा बेनेफिशिअरी कोड टाकून संबंधित माहिती अद्ययावत करणे गरजेचे आहे.

Back